Dengue : डेंग्यूचा कहर सुरुच! एकाच गावात ३००हून अधिक रुग्णांना प्रादुर्भाव

  120

आरोग्य यंत्रणेचा अलर्ट


कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कोसळत असला तरीही वातावरणातील उष्णता कमी झाली नाही. या बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशातच सध्या डेंग्यूने (Dengue) राज्यभरात थैमान घातले आहे.


पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीनंतर आता कोल्हापूरमध्येही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सातत्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून (Health Department) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



कोल्हापूरात ३०० हून अधिक रुग्ण


कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. एकाच गावात तब्बल ३००हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे. प्रत्येक घरात २ ते ३ ग्रामस्थांना डेंग्यूची लागणी झाली आहे. हणमंतवाडी परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयामध्ये ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचारासाठी ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झाली आहे. परंतु याबाबत जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



अमरावतीत पाच दिवसात ६ रुग्ण


अमरावतीच्या अनेक भागात पाऊस बरसत आहे. पावसाळ्यामुळे अनेक भागांत पाणी साचून त्यातून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. अमरावतीमध्ये पाच दिवसात सहा डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. अमरावतीमध्ये २१ जून रोजी डेंग्यूच्या २ रुग्णाची नोंद करण्यात आली. तर २५ जून रोजी डेंग्यूच्या ४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नारिकांमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरवात केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



'अशी' घ्या काळजी


वारंवार ताप येणे, थंडी भरून येणे, डोके दुखणे, हाडांचे दुखणे, उलट्या होणे, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, त्वचेवर लाल व्रण उठणे, ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीच डॉक्टरशी संपर्क साधावा, तसेच खिडक्यांना जाळ्या बसवून घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा, आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला