मुंबई: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत वाढीची घोषणा केली आहे. कंपनीचे नवे टेरिफ प्लान ३ जुलैपासून सुरू राहतील. कंपनीचा बेस प्लान आधी १५५ रूपयांचा होता जो वाढून आता १८९ रूपयांचा होईल. अशातच या दरात २२ टक्के वाढ झाली आहे.
रिलायन्स जिओने आपल्या १९ प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. यात १७ प्रीपेड आणि २ पोस्टपेड आहेत. येथे पहिल्यांदा जिओेने एअरटेलच्या आधी प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत.
नव्या टॅरिफ प्लाननुसार आधी जे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला महिन्याचा प्लान १५५ रूपयांचा होता त्यासाठी आता १८९ रूपये मोजावे लागणार आहेत. २०९ रूपयांच्या प्लानसाठी २४९ रूपये, २३९ रूपयांच्या प्लानसाठी २९९ रूपये, २९९ रूपयांच्या प्लानसाठी ३४९ रूपये मोजावे लागतील.
२८ दिवसांच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये जिथे २.५ जीबी दर दिवसाला डेटा मिळत होता त्यासाठी आता ३९९ रूपये भरावे लागतील.तर ३९९ रूपयांच्या प्लानसाठी आता ४४९ रूपये भरावे लागतील. यात ३ जीबी डेटा दिला जातो.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…