Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीReliance Jioच्या युजर्सना मोठा झटका

Reliance Jioच्या युजर्सना मोठा झटका

मुंबई: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत वाढीची घोषणा केली आहे. कंपनीचे नवे टेरिफ प्लान ३ जुलैपासून सुरू राहतील. कंपनीचा बेस प्लान आधी १५५ रूपयांचा होता जो वाढून आता १८९ रूपयांचा होईल. अशातच या दरात २२ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या १९ प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. यात १७ प्रीपेड आणि २ पोस्टपेड आहेत. येथे पहिल्यांदा जिओेने एअरटेलच्या आधी प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत.

Image

नव्या टॅरिफ प्लाननुसार आधी जे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला महिन्याचा प्लान १५५ रूपयांचा होता त्यासाठी आता १८९ रूपये मोजावे लागणार आहेत. २०९ रूपयांच्या प्लानसाठी २४९ रूपये, २३९ रूपयांच्या प्लानसाठी २९९ रूपये, २९९ रूपयांच्या प्लानसाठी ३४९ रूपये मोजावे लागतील.

२८ दिवसांच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये जिथे २.५ जीबी दर दिवसाला डेटा मिळत होता त्यासाठी आता ३९९ रूपये भरावे लागतील.तर ३९९ रूपयांच्या प्लानसाठी आता ४४९ रूपये भरावे लागतील. यात ३ जीबी डेटा दिला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -