OMG : अरे बाप रे! शालेय पोषण आहारात आढळली मृत चिमणी

  117

पुरवठा धारकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


नागपूर : प्राथमिक शिक्षणाचे (Primary Education) सार्वत्रिकीकरण (Universalization) करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत 'शालेय पोषण आहार' (School nutrition) योजना राबविण्यात आली. २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही योजना लागू केली. मात्र या पोषण आहारात काही दिवसांपूर्वी अळ्या लागल्याची घटना समोर आली होती. अशातच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात चक्क मेलेली चिमणी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ३वर्षांच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जात होता. त्यातील नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यासोबत चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ होत असून त्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


या घटनेनंतर शालेय मुलांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मृत पक्षी सीलबंद पाकिटात आला कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांकडून पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.



पुण्यातील पोषण आहारात किडे व अळ्यांचा समावेश


पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचे समोर आले आहे. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमके कोण कुणाचे पोषण करतेय, असा प्रश्न डोके वर काढत आहे.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन