OMG : अरे बाप रे! शालेय पोषण आहारात आढळली मृत चिमणी

  123

पुरवठा धारकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


नागपूर : प्राथमिक शिक्षणाचे (Primary Education) सार्वत्रिकीकरण (Universalization) करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत 'शालेय पोषण आहार' (School nutrition) योजना राबविण्यात आली. २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही योजना लागू केली. मात्र या पोषण आहारात काही दिवसांपूर्वी अळ्या लागल्याची घटना समोर आली होती. अशातच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात चक्क मेलेली चिमणी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ३वर्षांच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जात होता. त्यातील नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यासोबत चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ होत असून त्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


या घटनेनंतर शालेय मुलांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मृत पक्षी सीलबंद पाकिटात आला कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांकडून पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.



पुण्यातील पोषण आहारात किडे व अळ्यांचा समावेश


पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचे समोर आले आहे. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमके कोण कुणाचे पोषण करतेय, असा प्रश्न डोके वर काढत आहे.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना