नागपूर : प्राथमिक शिक्षणाचे (Primary Education) सार्वत्रिकीकरण (Universalization) करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत ‘शालेय पोषण आहार’ (School nutrition) योजना राबविण्यात आली. २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही योजना लागू केली. मात्र या पोषण आहारात काही दिवसांपूर्वी अळ्या लागल्याची घटना समोर आली होती. अशातच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात चक्क मेलेली चिमणी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ३वर्षांच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जात होता. त्यातील नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यासोबत चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ होत असून त्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेनंतर शालेय मुलांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मृत पक्षी सीलबंद पाकिटात आला कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांकडून पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचे समोर आले आहे. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमके कोण कुणाचे पोषण करतेय, असा प्रश्न डोके वर काढत आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…