खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातून (Kashedi tunnel) वाहतुकीसाठी परवानगी दिल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात त्यामध्ये पाण्याच्या धारा लागल्याने धोकादायक बनला आहे. बोगद्यात पाच ते सह ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून पाझर लागला असून त्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो.
कशेडी बोगद्यातून लहान वाहनांनी प्रति तास ३० किलोमीटर मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी छतातून कोसळत असल्याने प्रवाशांच्या उरात त्यामुळे धडकी भरत असून वेगाने बोगदा पार करण्यासाठी वाहनचालक वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाहीत.
बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर हा पहिलाच पावसाळा आहे. त्यातच आता कशेडी भोगद्यात पाण्याचे फवारे उडत असल्याने भितीचेही वातावरण आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार धर्माधिकारी व आय. आय. टी. मुंबई येथील तज्ज्ञांनी बोगद्याच्या पाहणी केली असून त्यांनीही तूर्तास कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…