BJP in Vidhnaparishad : दिल्लीत भाजपाच्या मोठ्या हालचाली! बावनकुळे आणि फडणवीस नड्डांच्या भेटीला

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली चर्चा?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाला (BJP) झटका सहन करावा लागल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhanparishad Election) दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी काल रात्री राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे देखील आता समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील (VidhanParishad Election 2024) उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप (BJP) पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील ३५ जण इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृत्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.


विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात, अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.



मंत्रिमंडळ विस्तारावर देखील झाली चर्चा


विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.



राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार


महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर