AFG vs BAN: अफगाणिस्तानने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये, ऑस्ट्रेलिया OUT

  122

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्याt-20 world cup 2024) सुपर ८ स्टेजमधील शेवटच्या सामन्यात बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. दोन्ही संघांदरम्यानचा हा सामना किंग्सटाऊनच्या अर्नोस वेल ग्राऊंडमध्ये रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेशला ८ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. २७ तारखेला अफगाणिस्तानचा सेमीफायनलमधील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्रिनिदादमध्ये रंगणार आहे.


या सामन्यात विजयासाठी बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार ११४ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र नवीन उल हकने सलग २ विकेट घेत सामन्यात अफगाणिस्तानचे पारडे उलटवले. सामन्यात कर्णधार रशीद खानने ४ विकेट घेत बांगलादेशचे कंबरडे तोडले.



शेवटच्या २ षटकांतील रोमांचक


बांगलादेशला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. त्यांचे ८ विकेट पडले होते. बांगलादेशची धावसंख्या ८ बाद १०२ होती. नवीन उल हल १८वे षटक टाकण्यासाठी आले होते. या ओव्हरमध्ये तस्कीन अहमदला नवीनने क्लीन बोल्ड केले.



बांगलादेशच्या आशा संपल्या


बांगलादेशला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ११६ धावांचे आव्हान १२.१ ओव्हरमध्ये पूर्ण करायचे होते. अशातच आशा संपल्या आहेत. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे होते.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र