weight loss: करू नका या ५ चुका, नाहीतर कमी होण्याऐवजी वाढेल वजन

मुंबई: खराब खाणेपिणे तसेच दिनचर्येमुळे आजकाल लठ्ठपणा वाढत चालला आहे. यामुळे बॉडीचा आकारही बिघडून जातो. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करत असतात मात्र जाणते-अजाणतेपणी अशा काही चुका होतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढतच जाते.



अधिक खाणे


सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपण जे काही हेल्दी खातो त्यामुळे वजन वाढणार नाही. खरंतर शरीरात कॅलरीज वाढल्या की वजन वाढू शकता. मग भले ही हेल्दी जरी खात असले तरी नेहमी संतुलित प्रमाणात खाल्ले पाहिजे.



केवळ खाण्या-पिण्यात सुधारणा


वजन कमी करायचे केवळ खाण्यापिण्यात सुधारणा करून काम चालणार नाही. यासाठी एक्सरसाईजही तितकीच महत्त्वाची असते. व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होतात मांसपेशी मजबूत यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो.



खाणे सोडून देणे


अनेक लोक कॅलरीज कमी करण्यासाठी भूक लागल्यानंतरही खात नाहीत मात्र हे बिल्कुल योग्य नाही. भूक मिटवण्यासाठी काही जण एकाच वेळेस भरपूर खातात मात्र यामुळे वजन वाढू शकते. दिवसभर थोडे थोडे हेल्दी खाल्ले पाहिजे.



पोषकतत्वे असलेले खाणे न खाणे


वजन कमी करण्याच्या नादात अनेक लोक संतुलित खाणे खात नाहीत. याचा फोकस कॅलरीज ठेवण्यावर असतो. मात्र शरीराला चांगले बनवण्यासाठी विविध पोषकतत्वांची गरज असते. यात प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो. यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होऊ लागतात.



हेल्दी पदार्थांना अनहेल्दी बनवणे


काही पदार्थ हेल्दी असतात मात्र त्यात असे काही मिसळले जाते ज्यामुळे ते अनहेल्दी बनतात. यामुळे कॅलरीज वाढतात आणि फॅट वेगाने वाढते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे