'आणीबाणी'वरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्‍लाबोल!

नवी दिल्ली : उद्या २५ जून आहे. हा दिवस भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असून, भारताच्या लोकशाहीला लागलेल्या डागाला उद्या ५० वर्ष पूर्ण होत आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्‍लाबोल केला.


आज १८व्‍या लोकसभेच्‍या पहिल्‍या अधिवेशनापूर्वी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, आणीबाणी काळात भारतीय राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली. राज्यघटनेचा प्रत्येक भाग फाडला गेला. देशाचे रुपांतर तुरुंगात झाले. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली. या प्रकाराला भारताची नवीन पिढी कधीही विसरणार नाही.


आपल्या राज्यघटनेचे रक्षण करताना, भारतातील लोकशाहीचे, लोकशाही परंपरांचे रक्षण करतानाच, ५० वर्षांपूर्वी घडलेले असे कृत्य भारतात पुन्हा करण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा संकल्प देशवासीय घेतील. भारतीय राज्यघटनेच्या निर्देशानुसार आम्ही सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करू, असेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.


देश आणि तेथील लोकांची सेवा करण्यासाठी सरकार सर्वांना सोबत आणण्याचा नेहमीच प्रयत्न करेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचवेळी विरोधकांनाही त्यांनी कठोर संदेश दिला. "भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे; लोकांना घोषणाबाजी नको, वस्तुस्थिती हवी आहे; त्यांना वादविवाद, परिश्रम हवे आहेत, नाटक आणि संसदेत व्यत्यय नको. मला आशा आहे की विरोधक लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील," असे ते म्हणाले.


देशाला खासदारांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि त्यांनी जनतेच्या हितासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदनही केले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च