Arvind Kejriwal : केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच!

  75

जामिनावर स्थगितीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयावर काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?


नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात (Delhi liquor scam) अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या मागील संकटे संपायचं नाव घेत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयानंतर (Delhi Highcourt) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केजरीवालांना पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने जामिनाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगिती विरोधात केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली होती. मात्र, या प्रकरणात केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांचा जामीन मंजूर होऊ शकलेला नाही.


दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टानं २० जून रोजी केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी ईडीने केजरीवाल यांच्या जामिनाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली व त्यावर हायकोर्टाने त्यावर स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही.


अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अरविंद केजरीवालांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. एकदा जामीन मिळाल्यानंतर त्याला स्थगिती दिली नाही पाहिजे, असं ते म्हणाले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मत मांडताना म्हटलं की हायकोर्टानं निर्णय लवकर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ईडीच्या वकिलांनी हायकोर्टाचा निर्णय दोन तीन दिवसात येईल असं म्हटलं.


दरम्यान, आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टात २६ जूनला सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टाचा निर्णय आल्यास तो देखील विचारात घेतला जाईल.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी