Credit Card : क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे पडणार महागात!

१ जुलैपासून 'हा' नवा नियम लागू होणार


मुंबई : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकार मोठे बदल करत असते. त्यातच जून महिन्याचा अखेर जवळ आला असून आरबीआयकडून (RBI) मोठे बदल होणार आहेत. क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार, १ जुलैपासून क्रेडिट कार्डसंदर्भात नवा नियम जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना कार्डद्वारे बिल भरणे महाग पडणार असल्याचे म्हटले जात आहे.


मिळालेल्या महितीनुसार, १ जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही सिस्टीम आणली आहे. त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे.



तीन महिन्यांचा वेळ द्या


१ जुलैपासून लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. देशभरात एकूण ३४ बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आतापर्यंत यातील केवळ ८ बँकानी बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे, असे बँकांनी म्हटले आहे.



काय अडचण येईल?


एचडीएफसी (HDFC) बँकेने आतापर्यंत २ कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने १.७ कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. तर अ‍ॅक्सिस (Axis Bank) बँकेचे एकूण १.४ कोटी क्रेडिट कार्ड आहेत. मात्र या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. त्यामुळे फोन पे, क्रेड, तसेच अन्य अ पवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या अ‍ॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डचे बील भरता येणार नाही.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी