Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अनेक दिवसांपासून आजारी; वाराणसीमध्ये सुरु होते उपचार


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे आज सकाळी पावणेसात वाजता निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर वाराणसीमध्ये (Varanasi) उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने काशीसह (Kashi) संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.


पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगळागुरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



कोण होते लक्ष्मीकांत दीक्षित?


रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राम मंदिराच्या अभिषेकात त्यांनी १२१ पुरोहितांचे नेतृत्व केले होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महावि‌द्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. त्यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. त्यांची भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर नितांत श्रद्धा होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही दीक्षित घराण्याच्या जुन्या पिढ्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते.



उपासना पद्धतीतही पारंगत


लक्ष्मीकांत दीक्षित हे यजुर्वेदाचे उत्तम अभ्यासक असण्यासोबतच उपासना पद्धतीचेही जाणकार मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी