Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अनेक दिवसांपासून आजारी; वाराणसीमध्ये सुरु होते उपचार


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे आज सकाळी पावणेसात वाजता निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर वाराणसीमध्ये (Varanasi) उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने काशीसह (Kashi) संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.


पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगळागुरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



कोण होते लक्ष्मीकांत दीक्षित?


रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राम मंदिराच्या अभिषेकात त्यांनी १२१ पुरोहितांचे नेतृत्व केले होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महावि‌द्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. त्यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. त्यांची भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर नितांत श्रद्धा होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही दीक्षित घराण्याच्या जुन्या पिढ्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते.



उपासना पद्धतीतही पारंगत


लक्ष्मीकांत दीक्षित हे यजुर्वेदाचे उत्तम अभ्यासक असण्यासोबतच उपासना पद्धतीचेही जाणकार मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च