SA vs IND: नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार टीम इंडिया, ४ सामन्यांची होणार टी-२० मालिका

मुंबई:भारतीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना ८ नोव्हेंबरला हॉलिवूडबेट्स किंग्समीड स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संयुक्त विधानादरम्यान ही घोषणा केली.


दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या विधानानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये किंग्समीड स्टेडियममध्ये सुरू होईल. त्यानंतर १० नोव्हेंबरला गक्बेरहामध्ये दुसरा टी-२० सामना, १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये तिसरा टी-२० सामना, १५ नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये चौथा आणि शेवटचा टी-२० सामना खेळवला जात आहे.


बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नेहमी मजबूत नाते राहिले आहे. या नात्यावर दोन्ही देशांना गर्व आहे. भारतीय क्रिकेट संघाला नेहमीच दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे आणि असेच प्रेम भारतीय चाहतेही दक्षिण आफ्रिकेच्या संघाप्रती दाखवतात.



भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक


पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबर - हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम
दुसरा टी-२० सामना १० नोव्हेंबर - डॅफाबेट सेंट जॉर्ज पार्क
तिसरा टी-२० सामना १३ नोव्हेंबर - सुपरस्पोर्ट पार्क
चौथा टी-२० सामना १५ नोव्हेंबर - डीपी वर्ल्ड वांडरर्स



द. आफ्रिका दौऱ्याआधी या देशांसोबत खेळणार टीम इंडिया


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात २ कसोटी सामने खेळवले जातील. हे सामने चेन्नई आणि कानपूरमध्ये होतील. तेथे ६ ते १२ ऑक्टोबरदरम्यान दोन्ही संघ ३ टी-२० सामने खेळतील. हे ३ टी-२० सामने अनुक्रमे धरमशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये होतील.


बांगलादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर ४ दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. किवी संघ १६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत भारतासोबत ३ कसोटी सामने खेळेल. पहिला सामना बंगळुरू, दुसरा पुणे आणि तिसरा कसोटी सामना मुंबईत खेळवला जाईल.

Comments
Add Comment

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला

आयर्लंडची दाणादाण, ऑस्ट्रेलिया ६७ धावांनी विजयी

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी जिंकला. या