Police Bharti 2024 : पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना फडणवीसांनी दिला दिलासा

पुढे ढकलण्यात आलेल्या मैदानी चाचण्या लवकरच घेणार


दुसऱ्या शहरातून आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश


मुंबई : राज्यात १९ जूनपासून १७ हजार ४७१ पदांसाठी मेगा पोलीस भरतीची (Police Bharti 2024) सुरुवात झाली आहे. यासाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.


उमेदवारांच्या या मागणीची दखल राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी घेतली असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.


ज्या ठिकाणी पाऊस सुरु आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मैदानी चाचण्यांसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देखील युनिट्सला देण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.


फडणवीस म्हणाले की, सध्या ज्या ठिकणी पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आले आहे. पुढे ही पावसाचे दिवस आहे आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सरकारकडून पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न होत आहे. कारण जर या चाचण्या खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिमाण होऊ शकतो. कारण अनेकांसाठी ही शेवटीची संधी ठरू शकते. त्यांना दुसरी संधी भेटत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांनी ठिकाणी चाचण्यांसाठी दुसऱ्या तारखा देण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.


तसेच मैदानी चाचणीसाठी उमेदवार दुसऱ्या शहरातून येतात त्यांना राहण्याची जागा नसते. त्यामुळे अनेकजण बस स्टॅण्डवर झोपताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भरतीच्या ठिकाणी जवळ असलेल्या मंगल कार्यालयात त्यांची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना दिले असल्याची देखील माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह