Pankaja Munde : पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? भाजपाच्या गोटात नेमक्या काय हालचाली?

  325

दिल्लीत पार पडली महत्त्वाची बैठक


मुंबई : बीड लोकसभा निवडणुकीत (Beed Loksabha) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागल्याने त्यांचे समर्थकही प्रचंड नाराज झाले. यातूनच पंकजा मुंडे निवडून न आल्याने काही समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या नाराज समर्थकांना खुश करणारी एक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेत (Rajyasabha) पाठवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याचे समजत आहे. तसं झालं तर हा पंकजा मुंडेंच्या समर्थकांसाठी आनंदाचा धक्का असेल.


दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.


राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती आहे.



पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या


पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेतील पराभव त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. मुंडे समर्थक कमालीचे निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील ४ मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहन केले होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित