ENG vs SA: अटीतटीच्या लढतीत द. आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय

  86

मुंबई: शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ६ धावांनी हरवले. हा सुपर ८मध्ये दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा विजय आहे त्यामुळे त्यांचे सेमीफायनलमध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडने खराब सुरूवात केली आणि पहिल्या १० षटकांतच इंग्लंडचा संघ अडखळताना दिसला.


इंग्लंड संघाची धावसंख्या ११ ओव्हरपर्यंत ४ बाद ६१ इतकी होती. यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या ७८ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले. मात्र ते विजय मिळवून देऊ शकले नाहीत.



आफ्रिकेच्या १६३ धावा


दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा खेळताना १६३ धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉक आणि रीजा हेंड्रिक्स यांच्यात ८६ धावांची सलामी भागीदारी झाली. एकावेळेस असे वाटत होते की आफ्रिका सहज २०० धावांचा आकडा पार करेल. मात्र संघाने मधल्या ओव्हरमध्ये केवळ ५२ धावा झाल्या. क्विंटन डी कॉकने ३८ बॉलमध्ये ६५ धावा केल्या यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर डेविड मिलरनेही २८ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी करत आफ्रिकेला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी