Nagpur Accident : नागपुरात १७ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडलं! मुलाचा जागीच मृत्यू

'हिट अँड रन'ने नागपूर पुन्हा हादरलं


नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा (Nagpur Hit nad Run case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच शहरात एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने नागपूर हादरलं आहे.


अश्विन आठवले (वय १७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री उशीरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विन ट्रकखाली चिरडला गेला. अपघात पाहून लोकांनी गर्दी केली. मात्र, गर्दी पाहताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठत अश्विनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आठवडाभरातील हिट अँड रनची ही तिसरी घटना आहे.



दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला


दोन दिवसांपूर्वी नागपुरातच फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडलं होतं. आता याप्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणातील मृतांचा आखडा ३ वर गेला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.


Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास