Nagpur Accident : नागपुरात १७ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडलं! मुलाचा जागीच मृत्यू

Share

‘हिट अँड रन’ने नागपूर पुन्हा हादरलं

नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा (Nagpur Hit nad Run case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच शहरात एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने नागपूर हादरलं आहे.

अश्विन आठवले (वय १७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री उशीरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विन ट्रकखाली चिरडला गेला. अपघात पाहून लोकांनी गर्दी केली. मात्र, गर्दी पाहताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठत अश्विनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आठवडाभरातील हिट अँड रनची ही तिसरी घटना आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला

दोन दिवसांपूर्वी नागपुरातच फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडलं होतं. आता याप्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणातील मृतांचा आखडा ३ वर गेला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

Recent Posts

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

30 mins ago

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

1 hour ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

1 hour ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

2 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

3 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

5 hours ago