तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, ६० रुग्णालयात दाखल

चेन्नई: तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिची जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कल्लाकुरिचीच्या जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी जिल्ह्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.


या प्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल २०० लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. यावेळी तपास केला असता त्यात घातक मेथनॉल होते.


मुख्यमंत्री एमके स्टालिन या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.


स्टालिन यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूचाी बातमी ऐकून मी स्तब्ध आणि दु:खी झालो. याप्रकऱणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्याविरोधातही कारवाई कऱण्यात आली आहे. जर लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील लोकांबाबत माहिती दिली तर तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले