तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, ६० रुग्णालयात दाखल

  97

चेन्नई: तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिची जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कल्लाकुरिचीच्या जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी जिल्ह्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.


या प्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल २०० लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. यावेळी तपास केला असता त्यात घातक मेथनॉल होते.


मुख्यमंत्री एमके स्टालिन या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.


स्टालिन यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूचाी बातमी ऐकून मी स्तब्ध आणि दु:खी झालो. याप्रकऱणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्याविरोधातही कारवाई कऱण्यात आली आहे. जर लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील लोकांबाबत माहिती दिली तर तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे