ENG vs WI: सॉल्टच्या वादळासमोर वेस्ट इंडिजची शरणागती, १८व्या षटकांतच इंग्लंडचा विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर ८ विकेट राखून विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.


सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद ८७ धावा तसेच जॉनी बेअरस्ट्रॉच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान १७.३ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने २५ धावा केल्या. तर मोईन अलीला १३ धावा करता आल्या.


सॉल्ट आणि बेअरस्ट्रॉने जबरदस्त फटकेबाजी करताना इंग्लंडला हा विजय साकारून दिला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज मात्र विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरले.


वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला १८ धावांनी हरवले. प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघ आहेत. या ग्रुपमधील दोन अव्वल संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.



१० षटकांत ठोकल्या ८२ धावा


इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर ८च्या सामन्यात पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असे वाटत होते. कारण त्यावेळेस वेस्ट इंडिजने १० षटकांत विकेट न गमावता ८२ धावा ठोकल्या होत्या.


वेस्ट इंडिज ज्या वेगाने धावा करत होता त्यामुळे ते २००चा आकडा पार करतील असे वाटत होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये कॅरेबियन फलंदाजांवर लगाम लावला. यामुळे त्यांना २० षटकांत १८० धावा करता आल्या.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण