ENG vs WI: सॉल्टच्या वादळासमोर वेस्ट इंडिजची शरणागती, १८व्या षटकांतच इंग्लंडचा विजय

  82

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर ८ विकेट राखून विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.


सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद ८७ धावा तसेच जॉनी बेअरस्ट्रॉच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान १७.३ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने २५ धावा केल्या. तर मोईन अलीला १३ धावा करता आल्या.


सॉल्ट आणि बेअरस्ट्रॉने जबरदस्त फटकेबाजी करताना इंग्लंडला हा विजय साकारून दिला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज मात्र विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरले.


वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला १८ धावांनी हरवले. प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघ आहेत. या ग्रुपमधील दोन अव्वल संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.



१० षटकांत ठोकल्या ८२ धावा


इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर ८च्या सामन्यात पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असे वाटत होते. कारण त्यावेळेस वेस्ट इंडिजने १० षटकांत विकेट न गमावता ८२ धावा ठोकल्या होत्या.


वेस्ट इंडिज ज्या वेगाने धावा करत होता त्यामुळे ते २००चा आकडा पार करतील असे वाटत होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये कॅरेबियन फलंदाजांवर लगाम लावला. यामुळे त्यांना २० षटकांत १८० धावा करता आल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र