Price Hike : मासळीचे दर दामदुप्पट, तर चिकनचीही तीनशेकडे वाटचाल

रत्नागिरी : समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे, सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यांसारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोने विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून, अनेक जण चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोहोचला आहे.


१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरुवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने, खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेक जण सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात.


रविवारी या ठिकाणी मासे खरेदीसाठी गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेले पाहायला मिळाले. मासे खरेदी करताना, अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा ६०० रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये आकारले जात आहेत.


बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यांसारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. त्यामुळे सध्या चिकन, मटणाला मोठी मागणी आहे. काही जण मासे आणून, त्यावर इच्छा भागवून घेतात. पण माशांचे दर पाहून काहींचा कल चिकन खरेदीकडेच वाढला आहे. मात्र चिकनचे दरही तीनशे रुपयांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहेत.

Comments
Add Comment

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

Cabinet Decision : शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी

आचारसंहितेनंतर निकषांची घोषणा, ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मुंबई : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत