Bomb Threat: इंडिगोची फ्लाईट, ४१ एअरपोर्ट आणि ६० हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी, तपासले असता...

मुंबई: चेन्नईवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात मंगळवारी रात्री १०.२४ वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करावे लागले.


लँडिंगनंतर विमानाला आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले. येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. या विमानात १९६ प्रवासी आणि ७ सदस्य होते.



४१ विमानतळांना बॉम्बने उडवण्याची दिली होती धमकी


मंगळवारी रो सीएसएमआयएसह देशभरातील ४१ विमानतळांवर बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे ईमेल आले होते. दरम्यान, या धमक्या खोट्या निघाल्या. पीटीआयने मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार या धमक्यांमुळे विमान सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.



हॉस्पिटल्सना उडवण्याची धमकी खोटी


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या तब्बल ६० रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांत बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यात खाजगी आणि सरकारही दोनही रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णालयांना ईमेल मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली आणि तपास करण्यात आला. ईमेल मध्ये म्हटले होते की बॉम्ब बेडच्या खाली आणि शौचालयांमध्ये ठेवण्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये तपास केला असता काही हाती लागले नाही.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला