PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही...

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसीच्या एअरपोर्टवर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरमधून मेहंदीगंज सभेच्या ठिकाणी पोहोचतील.


यातील किसान संवाद कार्यक्रमात दे देशातील ९.६० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत २० हजार कोटीहून अधिक पीएम किसान सन्मान निधी योजना जारी करतील. हा १७वा हप्ता अशेल. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळेस ते प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतील.


या दर्यान सर्व शेतकरी भगव्या टोपीत दिसतील. शेतकरी आणि महिला समूहांना ३०० घरे देतील. १६७ शेतकरी सखींना प्रमाणपत्र देतील. या महिला ऑरगॅनिक शेती करतात. या दरम्यान मिनी रोड शोची एक झलक दिसेल. संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी पुन्हा एकदा वाराणसीकर उत्सुक झाले आहे. याची पहिली झलक वाराणसीच्या नमो घाटावर पाहता येऊ शकते. येथील व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्याने वाळूने पंतप्रधान मोदींचा सुंदर फोटो बनवला आहे. तसेच रंगही भरले आहेत. वाराणसीच्या भाजपाच्या काशी प्रांताचे अध्यक्ष दिलीप पटेल यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींचे स्वागत ऐतिहासिक असेल.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन