PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही...

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसीच्या एअरपोर्टवर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरमधून मेहंदीगंज सभेच्या ठिकाणी पोहोचतील.


यातील किसान संवाद कार्यक्रमात दे देशातील ९.६० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत २० हजार कोटीहून अधिक पीएम किसान सन्मान निधी योजना जारी करतील. हा १७वा हप्ता अशेल. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळेस ते प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतील.


या दर्यान सर्व शेतकरी भगव्या टोपीत दिसतील. शेतकरी आणि महिला समूहांना ३०० घरे देतील. १६७ शेतकरी सखींना प्रमाणपत्र देतील. या महिला ऑरगॅनिक शेती करतात. या दरम्यान मिनी रोड शोची एक झलक दिसेल. संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी पुन्हा एकदा वाराणसीकर उत्सुक झाले आहे. याची पहिली झलक वाराणसीच्या नमो घाटावर पाहता येऊ शकते. येथील व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्याने वाळूने पंतप्रधान मोदींचा सुंदर फोटो बनवला आहे. तसेच रंगही भरले आहेत. वाराणसीच्या भाजपाच्या काशी प्रांताचे अध्यक्ष दिलीप पटेल यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींचे स्वागत ऐतिहासिक असेल.

Comments
Add Comment

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या