Mahpareshan Recruitment : महापारेषणची तब्बल २ हजार ५४१ पदांसाठीची भरती अचानक रद्द!

विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण


मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने (Mahpareshan) विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहीर केलेली परीक्षा अचानक रद्द केली आहे (Exam cancel). गेल्यावर्षी ही भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास ८० टक्के परीक्षा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अचानक ही परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, मात्र त्यांचे समाधान झालेले नाही.


गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महापारेषणच्या २ हजार ५४१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कंपनीचे स्पष्ट केले आहे. मात्र ही आपली फसवणूक असल्याची भावना परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.


कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (दूरसंचार), सहाय्यक अभियंता या पदांसाठी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. तर वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी) यासाठी २० नोव्हेंबर २०२३, सहाय्यक अभियंता पदासाठी १९ जानेवारी २०२४ व वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती.


दरम्यान, ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा काढला जाणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,

Madgaon Tejas Express : तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्याऐवजी बिस्किट पुडा! IRCTCकडून कंत्राटदाराला दणका!

मडगाव : मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (Madgaon Tejas Express) प्रवाशांना दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत

IMD Weather Update : चिंता वाढली! मोथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण; पुढचे ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रासाठी IMDचा नवा इशारा!

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD - Indian Meteorological Department) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.