Mahpareshan Recruitment : महापारेषणची तब्बल २ हजार ५४१ पदांसाठीची भरती अचानक रद्द!

  49

विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण


मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने (Mahpareshan) विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहीर केलेली परीक्षा अचानक रद्द केली आहे (Exam cancel). गेल्यावर्षी ही भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास ८० टक्के परीक्षा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अचानक ही परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, मात्र त्यांचे समाधान झालेले नाही.


गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महापारेषणच्या २ हजार ५४१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कंपनीचे स्पष्ट केले आहे. मात्र ही आपली फसवणूक असल्याची भावना परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.


कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (दूरसंचार), सहाय्यक अभियंता या पदांसाठी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. तर वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी) यासाठी २० नोव्हेंबर २०२३, सहाय्यक अभियंता पदासाठी १९ जानेवारी २०२४ व वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी भरतीची जाहिरात देण्यात आली होती.


दरम्यान, ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा काढला जाणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक