Yavatmal Crime : गावातील काही कुटुंबांच्या घरी पाळणा हलत नाही म्हणून एका जोडप्याला बेदम मारहाण!

समोर आलं याचं भयानक कारण


यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal News) बाभूळगाव (Babhulgaon) तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बाभूळगाव यावली येथे एका जोडप्यांनी जादुटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची माहिती उघडकीस आली आहे. मारहाणीत फिर्यादीचा डोळा फुटल्याने त्याला शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव तालुक्यातील यावली येथील काही कुटुंबाला मुल बाळ होत नाही. त्यामुळे गावातील प्रमोद वाकोडे आणि त्याच्या पत्नीने जादुटोणा केला, असा संशय गावकऱ्यांना आला होता. अशा प्रकरणामुळे संपूर्ण गाव अंधश्रद्धेचे बळी पडू नये, यासाठी गावातील प्रज्वल ठाकरे आणि इतर आठ लोकांनी प्रमोदच्या घरी जाऊन हा प्रकार रोखण्यासाठी त्याला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. मात्र या घटनेत प्रमोदच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रकरणी जखमी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून बाभूळगाव पोलिसांनी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या