Pune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता


पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागा जिंकत महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली. परंतु हीच आघाडी विधानसभेतही (Vidhansabha Election) एकनिष्ठ राहणार का, असा सवाल मविआची सद्यपरिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. मविआच्या नेत्यांनी ही निवडणूक एकत्रच लढवणार असल्याचे सांगितले असले तरी अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आल्यावाचून राहत नाहीत. त्यातच आता पुण्याच्या जागांवरुन (Pune vidhansabha) ठाकरे गटात (Thackeray Group) व राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar group) नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्ही पक्षांकडून पुण्याच्या मतदारसंघांवर दावा ठोकण्यात आला आहे.


पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. पुण्यातील आठही मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानेही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केला आहे. कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. यांतील चार जागांवर दोन्ही गटाने दावा ठोकला असून त्यामुळे दोघांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी पुण्यातील या मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लांबू शकते. येत्या काळात मविआत कोण सांमजस्याची भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र