West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया


दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या