Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे म्हणजे 'गरज सरो वैद्य मरो'चं उत्तम उदाहरण!

प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला संताप


मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात युतीच्या चर्चा झाल्या होत्या. परंतु काही कारणास्तव ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही व वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचा वंचितला फटका बसला, तर मविआने मात्र ३० जागा जिंकल्या. त्याबद्दल उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. मात्र, ठाकरेंच्या या भूमिकेवरुन प्रकाश आंबेडकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी दलित व बौद्धांचे कुठेच आभार न मानल्याने प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे 'गरज सरो वैद्य मरो'चं उत्तम उदाहरण असा जळजळीत टोलाही त्यांनी लगावला आहे.


प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'गरज सरो वैद्य मरो'चं उत्तम उदाहरण. उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी उबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा