Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले. एनडीचे सरकार बनल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


गंभीरने अमित शाहा यांना निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर आपल्या आणि अमित शहा यांच्या भेटीचे फोटो शेअर केले तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात भारत सुरक्षेच्या बाबतीत आणखीन सुधारेल आणि देशात स्थिरता वाढेल.



गौतम गंभीरने राजकारण सोडले?


गौतम गंभीरने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार म्हणून दिल्ली येथून निवडणूक लढवली होती. गंभीरने त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना यांना ६,९५,१०९ मतांच्या फरकाने हरवले होते. आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या माजी क्रिकेटरने २ मार्च २०२४ला घोषणा करताना सांगितले की तो राजकारणातून बाहेर होत आहे. तसेच पुढे केवळ क्रिकेटच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देईल.


 


भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार?


गौतम गंभीर सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी