UPSC exam : गुगल मॅपमुळे रस्ता चुकला; तीन मिनिटे उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला!

यूपीएससी परीक्षार्थींसोबत घडला धक्कादायक प्रकार


छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत असतात. वर्षानुवर्षे मेहनत करुन विद्यार्थी या परिक्षेची तयारी करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका केंद्रावर गुगल मॅपने (Google map) चुकीचा रस्ता दाखवल्याने यूपीएससीचे (UPSC) परीक्षार्थी परीक्षा देऊ न शकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे साहजिकच या परीक्षार्थींना अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.


मिळालेल्या माहितीनुसार, आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. सदर प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. बाहेरील जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी विवेकानंद महाविद्यालयात येणार होते. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजच्या पत्त्याचा घोळ झाल्याने आणि गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेकांना परीक्षेस मुकावे लागले.


गुगल मॅपवर या कॉलेजचा पत्ता वाळूज पंढरपूर येथे असल्याचंही दाखवत असल्याने हे विद्यार्थी वाळूज पंढरपूरला गेले होते. मात्र तिथे हे कॉलेज अस्तित्वात नाही आणि कुठलीही परीक्षा देखील चालू असल्याचे निदर्शनास आले नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गेटवर २ ते ३ मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे