UPSC exam : गुगल मॅपमुळे रस्ता चुकला; तीन मिनिटे उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला!

  64

यूपीएससी परीक्षार्थींसोबत घडला धक्कादायक प्रकार


छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत असतात. वर्षानुवर्षे मेहनत करुन विद्यार्थी या परिक्षेची तयारी करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका केंद्रावर गुगल मॅपने (Google map) चुकीचा रस्ता दाखवल्याने यूपीएससीचे (UPSC) परीक्षार्थी परीक्षा देऊ न शकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे साहजिकच या परीक्षार्थींना अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.


मिळालेल्या माहितीनुसार, आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. सदर प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. बाहेरील जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी विवेकानंद महाविद्यालयात येणार होते. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजच्या पत्त्याचा घोळ झाल्याने आणि गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेकांना परीक्षेस मुकावे लागले.


गुगल मॅपवर या कॉलेजचा पत्ता वाळूज पंढरपूर येथे असल्याचंही दाखवत असल्याने हे विद्यार्थी वाळूज पंढरपूरला गेले होते. मात्र तिथे हे कॉलेज अस्तित्वात नाही आणि कुठलीही परीक्षा देखील चालू असल्याचे निदर्शनास आले नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गेटवर २ ते ३ मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची