ST Bus : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रशासनाने राबवली 'ही' विशेष मोहिम

आता एसटी पाससाठी रांगेत ताटकळावं लागणार नाही


मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Bus) बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीतून विद्यार्थ्यांना ६६ टक्के सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ ३३ टक्के पैसे भरुन पास काढता येत असतो. तर विद्यार्थीनींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास (ST Bus Pass) मिळत असतो. मात्र हा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी केंद्रावर भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. यंदा विद्यार्थ्यांना बस पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. एसटी प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी योजना आखली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना थेट शाळेतच पास वितरित करण्यात येणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना एसटी केंद्रावर रांगेत उभे राहून किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घ्यावे लागत. मात्र यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत उभे न राहता पास थेट हातात येणार असल्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.



एसटीने केला हा बदल


एसटी महामंडळाला शाळा - महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देणार आहे. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जून पासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय