PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याअंतर्गत ४००हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची संपूर्ण देशभर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



पदाचे नाव व रिक्त जागा


१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४



शैक्षणिक पात्रता



  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA.

  •  GATE २०२४ परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी.



अर्ज फी



  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.


वेतन


४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


https://careers.powergrid.in/recruitment-nextgen


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


http://www.powergrid.in

Comments
Add Comment

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं