PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याअंतर्गत ४००हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची संपूर्ण देशभर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



पदाचे नाव व रिक्त जागा


१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४



शैक्षणिक पात्रता



  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA.

  •  GATE २०२४ परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी.



अर्ज फी



  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.


वेतन


४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


https://careers.powergrid.in/recruitment-nextgen


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


http://www.powergrid.in

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव