PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याअंतर्गत ४००हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची संपूर्ण देशभर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



पदाचे नाव व रिक्त जागा


१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४



शैक्षणिक पात्रता



  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA.

  •  GATE २०२४ परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी.



अर्ज फी



  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.


वेतन


४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


https://careers.powergrid.in/recruitment-nextgen


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


http://www.powergrid.in

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या