PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! 'या' विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (PGCIL Recruitment) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याअंतर्गत ४००हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची संपूर्ण देशभर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



पदाचे नाव व रिक्त जागा


१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४



शैक्षणिक पात्रता



  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA.

  •  GATE २०२४ परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी.



अर्ज फी



  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

  • मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.


वेतन


४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


https://careers.powergrid.in/recruitment-nextgen


अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


http://www.powergrid.in

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही