Anuskura Landslide : अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरुच; पुन्हा वाहतुकीचा खोळंबा!

रत्नागिरी : सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या (collapse) घटना घडत आहेत. त्यातच काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसामुळे अणुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची (Anuskura Landslide) माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले.



पावसामुळे कामात अडथळा


दरड कोसळण्याची घटना घडताच तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू केले. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील मागवण्यात आली होती. मात्र रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आज पहाटेपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरू केले असल्याचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


दरम्यान, अणुस्कुरा घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील वाहने या घाटातून धावतात. याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट