Anuskura Landslide : अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरुच; पुन्हा वाहतुकीचा खोळंबा!

  79

रत्नागिरी : सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या (collapse) घटना घडत आहेत. त्यातच काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसामुळे अणुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची (Anuskura Landslide) माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले.



पावसामुळे कामात अडथळा


दरड कोसळण्याची घटना घडताच तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू केले. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील मागवण्यात आली होती. मात्र रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आज पहाटेपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरू केले असल्याचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


दरम्यान, अणुस्कुरा घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील वाहने या घाटातून धावतात. याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार