रत्नागिरी : सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या (collapse) घटना घडत आहेत. त्यातच काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसामुळे अणुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची (Anuskura Landslide) माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले.
दरड कोसळण्याची घटना घडताच तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू केले. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील मागवण्यात आली होती. मात्र रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आज पहाटेपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरू केले असल्याचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अणुस्कुरा घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील वाहने या घाटातून धावतात. याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…