धक्कादायक! कॉफीत आढळले काचेचे तुकडे

  50

ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


अमरावती : मुंबई मालाड येथे आईस्क्रीममध्ये मानवाचे बोट आढळल्याची घटना जवलंत असताना अशीच आणखी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. अमरावती मधील एका हॉटेलमध्ये कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कॉफी पिणाऱ्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही. मात्र सततच्या वाढत्या अशा प्रकरणामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉफी पिताना ग्राहकांच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. कॉफी पिताना अचानक काचेचे तुकडे दिसल्याने ग्राहकाने तीव्र संतापला व्यक्त केला. या प्रकरणी तरुणांनी हॉटेल संचालकाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनात तक्रार केली आहे. त्यासोबत हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.



नेमके काय घडले?


अमरावतीमधील सुमेध इंगळे आणि अभिजीत वानखेडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरातील एनसीसीस कॅन्टीन समोरील एका हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळानंतर दोन्ही युवकांना कॉफी देण्यात आली. यावेळी कॉफी पिताना दोन्ही युवकांना ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. त्यानंतर कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉटेल संचालकांना जाब विचारला. सुदैवाने दोन्ही युवकांना कोणताही त्रास झाला नसून हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे म्हटले.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली