धक्कादायक! कॉफीत आढळले काचेचे तुकडे

  55

ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


अमरावती : मुंबई मालाड येथे आईस्क्रीममध्ये मानवाचे बोट आढळल्याची घटना जवलंत असताना अशीच आणखी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. अमरावती मधील एका हॉटेलमध्ये कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कॉफी पिणाऱ्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही. मात्र सततच्या वाढत्या अशा प्रकरणामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉफी पिताना ग्राहकांच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. कॉफी पिताना अचानक काचेचे तुकडे दिसल्याने ग्राहकाने तीव्र संतापला व्यक्त केला. या प्रकरणी तरुणांनी हॉटेल संचालकाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनात तक्रार केली आहे. त्यासोबत हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.



नेमके काय घडले?


अमरावतीमधील सुमेध इंगळे आणि अभिजीत वानखेडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरातील एनसीसीस कॅन्टीन समोरील एका हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळानंतर दोन्ही युवकांना कॉफी देण्यात आली. यावेळी कॉफी पिताना दोन्ही युवकांना ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. त्यानंतर कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉटेल संचालकांना जाब विचारला. सुदैवाने दोन्ही युवकांना कोणताही त्रास झाला नसून हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे म्हटले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या