Water Crisis : पावसाळ्यातही मराठवाड्यावर जलसंकट!

'या' जिल्ह्यांना अजूनही पाणीटँकरचा पाणीपुरवठा


हिंगोली : मागील महिन्यात उन्हाच्या कडाक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत होते. महिलांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आता जून महिन्याला सुरुवात झाली असून मान्सूनचेही (Monsoon) आगमन झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही अनेक गावांना पाणीबाणीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.



मराठवाड्यात आजही टँकरने पाणीपुरवठा


दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच मराठवाड्यात हा पाऊस धो-धो बरसला. पहिल्याच पावसात नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. त्यामुळे पहिल्याच पावसात मराठवाड्यात पाऊसपाणी झाले. एकीकडे असे चित्र असताना आजही मराठवाड्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ही टँकर लॉबी तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात १० टँकर सुरू


जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले. या महिन्यात चांगला दमदार पाऊस होऊनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावात दररोज टँकर येऊन त्यातील प्रत्येक घराला १५ घागर पाणी मिळते. नागरिकांना याच पाण्यामधून पिण्याच्या पाण्यासह इतर कामासाठी देखील वापर करावा लागत आहे. नागरिकांना पावसाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाई भासणार नाही असे वाटत होते, मात्र अजूनही नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



'या' शहरात पाणीटँकरने पाणीपुरवठा



  • छत्रपती संभाजीनगर येथे ५५५ गाव वाड्यांवर ७४१ टँकर सुरू आहेत.

  • जालना ४७५ गाव वाड्यांवर ५४२ टँकर सुरू आहेत.

  • बीड ७३९ गाव वाड्यांवर ४६८ टँकर सुरू आहेत.

  • परभणी ३२ गाव वाड्यांवर ३३ टँकर सुरू आहेत.

  • हिंगोली १० गाव वाड्यांवर १० टँकर सुरू आहेत.

  • नांदेड ४० गाव वाड्यांवर ३९ टँकर सुरू आहेत.

  • धाराशिव १०२ गाव वाड्यांवर १५० टँकर सुरू आहेत.

  • लातूर ४७ गाव वाड्यांवर ४१ टँकर सुरू आहेत.


दरम्यान, गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि टँकर हे एक जणू समीकरण बनले आहे. यातूनच टँकर लॉबी सारखा प्रकार समोर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे धो धो पाऊस पडूनही मराठवाड्यातील दुष्काळ कधी मिटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत