Water Crisis : पावसाळ्यातही मराठवाड्यावर जलसंकट!

'या' जिल्ह्यांना अजूनही पाणीटँकरचा पाणीपुरवठा


हिंगोली : मागील महिन्यात उन्हाच्या कडाक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत होते. महिलांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आता जून महिन्याला सुरुवात झाली असून मान्सूनचेही (Monsoon) आगमन झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही अनेक गावांना पाणीबाणीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.



मराठवाड्यात आजही टँकरने पाणीपुरवठा


दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच मराठवाड्यात हा पाऊस धो-धो बरसला. पहिल्याच पावसात नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. त्यामुळे पहिल्याच पावसात मराठवाड्यात पाऊसपाणी झाले. एकीकडे असे चित्र असताना आजही मराठवाड्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ही टँकर लॉबी तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात १० टँकर सुरू


जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले. या महिन्यात चांगला दमदार पाऊस होऊनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावात दररोज टँकर येऊन त्यातील प्रत्येक घराला १५ घागर पाणी मिळते. नागरिकांना याच पाण्यामधून पिण्याच्या पाण्यासह इतर कामासाठी देखील वापर करावा लागत आहे. नागरिकांना पावसाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाई भासणार नाही असे वाटत होते, मात्र अजूनही नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



'या' शहरात पाणीटँकरने पाणीपुरवठा



  • छत्रपती संभाजीनगर येथे ५५५ गाव वाड्यांवर ७४१ टँकर सुरू आहेत.

  • जालना ४७५ गाव वाड्यांवर ५४२ टँकर सुरू आहेत.

  • बीड ७३९ गाव वाड्यांवर ४६८ टँकर सुरू आहेत.

  • परभणी ३२ गाव वाड्यांवर ३३ टँकर सुरू आहेत.

  • हिंगोली १० गाव वाड्यांवर १० टँकर सुरू आहेत.

  • नांदेड ४० गाव वाड्यांवर ३९ टँकर सुरू आहेत.

  • धाराशिव १०२ गाव वाड्यांवर १५० टँकर सुरू आहेत.

  • लातूर ४७ गाव वाड्यांवर ४१ टँकर सुरू आहेत.


दरम्यान, गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि टँकर हे एक जणू समीकरण बनले आहे. यातूनच टँकर लॉबी सारखा प्रकार समोर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे धो धो पाऊस पडूनही मराठवाड्यातील दुष्काळ कधी मिटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.