MNS : लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पण विधानसभेला मनसे लढणार स्वबळावर?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांना (Political Parties) विधानसभा निवडणुकीचे (Vishan Sabha Election) वेध लागले आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी 'एकला चलो रा' चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यासाठी त्यांनी २००-२५० जागांची तयारी सुरु केली आहे.


आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची करणार चाचपणी करणार असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी मनसेकडून फायनल केली जाणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यांपैकी २००-२५० जागा मनसे लढवणार असल्याची शक्यता आहे.


मनसेला या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनसेने चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई