MNS : लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पण विधानसभेला मनसे लढणार स्वबळावर?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांना (Political Parties) विधानसभा निवडणुकीचे (Vishan Sabha Election) वेध लागले आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी 'एकला चलो रा' चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यासाठी त्यांनी २००-२५० जागांची तयारी सुरु केली आहे.


आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची करणार चाचपणी करणार असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी मनसेकडून फायनल केली जाणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यांपैकी २००-२५० जागा मनसे लढवणार असल्याची शक्यता आहे.


मनसेला या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनसेने चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस