
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आणि टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेच्या संघाला ७ विकेटनी हरवले. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. भारताचा हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ३ विकेट गमावताना पूर्ण केले आणि सामना आपल्या नावे केला.
भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश
कठीण परिस्थितीत अडकलेला पाकिस्तानचा संघ या सामन्यात भारताच्या विजयासाठीच प्रार्थना करत होता. पाकिस्तानला जर सुपर ८ला क्वालिफाय करायचे असेल तर त्याला उरलेला सामना जिंकावा लागेल. सोबतच अमेरिकेने उरलेला सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल.
ग्रुप एमध्ये भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. त्यांचे ४ गुण आहेत. भारताच्या विजयाने पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत.