Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदार म्हणून बिनविरोध निवड!

केंद्रातही मंत्रीपद मिळणार?


नवी दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) पराभव झाला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी (Rajyasabha MP) उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज न आल्याने त्या बिनविरोध खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.


खासदारकी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष, कार्यकर्ते व पक्षातील सर्व नेत्यांचे मी आभार मानते. मी दिलेल्या संधीचं सोनं करेन. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते', अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने