Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदार म्हणून बिनविरोध निवड!

केंद्रातही मंत्रीपद मिळणार?


नवी दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) पराभव झाला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी (Rajyasabha MP) उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज न आल्याने त्या बिनविरोध खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.


खासदारकी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष, कार्यकर्ते व पक्षातील सर्व नेत्यांचे मी आभार मानते. मी दिलेल्या संधीचं सोनं करेन. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते', अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी