Nagpur Blast : नागपुरात अग्नितांडव! स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट

  62

६ जणांचा मृत्यू तर चार ते पाच जण गंभीर जखमी


नागपूर : डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील भीषण आगीची घटना ज्वलंत असतानाच नागपूरमध्येही मोठा स्फोट (Nagpur Blast) झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. नागपूरच्या धामणा येथील चामुंडा (Chamunda) कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तहसीलच्या धामणा येथील चामुंडा नावाच्या कंपनीत स्फोटकांशी संबंधित सर्व कामे केली जातात. आज दुपारी १च्या सुमारास पॅकेजिंग विभागात आग लागल्याची माहिती आली होती. त्यानंतर काही वेळातच या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कंपनीमध्ये १० कामगार काम करत होते. हा स्फोट इतका भीषण होता की काम करणाऱ्या १० पैकी सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून इतर चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. जखमींना तातडीने नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच