खांडू यांनी सलग तिसऱ्यांदा घेतली अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

इटानगर : भाजपचे ज्येष्ठ नेते पेमा खांडू यांनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचा हा तिसरा कार्यकाळ आहे.


खांडू यांना राज्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) के. टी. पारनाईक यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येथील डी. के. स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका शानदार समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


यावेळी खांडू यांच्यासह चौखम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले चौना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बियुराम वाहगे, न्यातो दुकम, गॅब्रिएल डेनवांग वांग्सू, वांगकी लोवांग, माजी विधानसभा अध्यक्षांसह पासांग दोर्जी सोना, मामा नातुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओजिंग तासिंग यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.


खंडू यांच्या मंत्रीमंडळात आठ नवीन चेहरे आहेत. पासांग दोर्जी सोना, बियुराम वाहगे, न्यातो दुकम, गॅब्रिएल डेनवांग वांगसू, दसांगलू पुल, नालो राजा, केंटो जिनी आणि ओजिंग तासिंग हे ते आहेत.


चीनच्या सीमेला लागून असलेल्या अंजाव जिल्ह्यातील हायुलियांग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दसांगलू पुल या एकमेव महिला मंत्री आहेत. त्या माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांच्या पत्नी आहेत.


या शपथविधी सोहळ्याला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, आसामचे मुख्यमंत्री आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे निमंत्रक, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, खासदार तापीर गाओ आणि नबाम रेबिया आणि अरुणाचलचे नेतेही उपस्थित होते.


तत्पूर्वी, पक्षाचे केंद्रीय निरीक्षक, रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी खांडू यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड केली. या बैठकीला अरुणाचलचे तिन्ही खासदारही उपस्थित होते.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ४६ जागा जिंकून भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहे.

Comments
Add Comment

Carbide Gun Causes : खेळणं की 'घातक शस्त्र'? दिवाळीचा आनंद अंधारात! १५० रुपयांच्या कार्बाइड गनने १४ चिमुकल्यांची दृष्टी हिरावली

जबलपूर : यावर्षी अनेक घरांसाठी दिवाळीचा सण आनंद नव्हे, तर दुःख आणि मोठी चिंता घेऊन आला आहे. याचे कारण म्हणजे

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय