School Nutritious Food : पोषण आहारात मिळणार अंडा पुलावासह खीर

सहा प्रकारच्या पुलावांचा समावेश


मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून अधिक सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन आठवड्यांत प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ दिले जाणार आहेत. यात विविध सहा प्रकारचे पुलाव, तांदळाची खीर, उसळ, नाचणीचे सत्व यांसह १५ प्रकारचे पदार्थ दिले जाणार आहे.


या निर्णयानुसार व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटर पुलाव, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव अशा प्रकारच्या पाच पुलावांसह मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व व मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटर) आदी पदार्थांचा यात समावेश राहणार आहे. राज्यात सद्यःस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच शासन निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत.


विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आडवड्यातील चार दिवस तांदळाची खीर व एक दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थांचा लाभ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव दिला जाणार आहे, तर अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी व्हेजिटेबल पुलाव दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.