School Nutritious Food : पोषण आहारात मिळणार अंडा पुलावासह खीर

सहा प्रकारच्या पुलावांचा समावेश


मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून अधिक सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन आठवड्यांत प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ दिले जाणार आहेत. यात विविध सहा प्रकारचे पुलाव, तांदळाची खीर, उसळ, नाचणीचे सत्व यांसह १५ प्रकारचे पदार्थ दिले जाणार आहे.


या निर्णयानुसार व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटर पुलाव, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव अशा प्रकारच्या पाच पुलावांसह मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व व मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटर) आदी पदार्थांचा यात समावेश राहणार आहे. राज्यात सद्यःस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच शासन निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत.


विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आडवड्यातील चार दिवस तांदळाची खीर व एक दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थांचा लाभ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव दिला जाणार आहे, तर अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी व्हेजिटेबल पुलाव दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

घाटकोपरमध्ये भरदिवसा दरोडा : सराफाच्या दुकानावर चाकूने हल्ला करून सोन्याची लूट, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : घाटकोपरमधील अमृत नगर परिसरात आज सकाळी (१५ ऑक्टोबर) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून

पर्यावरणाची काळजी घेत आणि सुरक्षिततेचे नियम पाळत कशी कराल साजरी दीपावली

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा.

Shivsena vs Sadavatre : ब्रेकिंग! एसटी बँकेत भर बैठकीत राडा, बाटल्या फेकल्या; सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC)

महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६

सोशल मीडियातील चूक 'येवले अमृततुल्य'ला भोवणार ?

मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर