Phd Exam : विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! आता घरबसल्या देता येणार 'पेट' परीक्षा

  83

'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार


सोलापूर : विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. पूर्व 'पेट' परीक्षा (Phd Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे. सोलापूर (Solapur) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar University) यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशासह परदेशातील कोणत्याही विद्यार्थ्याला आता घरबसल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 'पेट' देता येणार आहे. (Online Exam)



१३ जूनपासून अर्ज करण्याची सुरुवात


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी 'पीएच.डी.' च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. 'पीएच.डी' पूर्वीची पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची लिंक खुली असणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील.


विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, पेट परीक्षेत दोन पेपर असतात. त्यामध्ये सकाळी रिसर्चचा पेपर तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही देता येणार आहे. मात्र कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हा पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे. तर १८ ते २० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाने सांगितले आहे.


दरम्यान, एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जुलैला परीक्षा देता येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा २२ जुलैला होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या