मुंबई : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फोन घेत नाहीत, असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल जाहीर व्यक्त केला. यावरून महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेत्यांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
नाना पटोले म्हणाले की, “ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. विधान परिषदेच्या दोन जागा तुम्ही लढा आणि दोन जागा आम्ही लढतो असे मी त्यांनी सांगितले. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण? असे विचारले. त्यावर मी उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधल्या काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलावून घेतले आणि स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता, तर या चारही जागा जिंकणे सोपे झाले असते. ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला. पण त्यांचे ऑपरेटर ‘साहेब तयार होत आहेत’, असा निरोप देत होते. शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल,” असेही पटोले म्हणाले.
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…
एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…