Nana Patole : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत

  44

मुंबई : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फोन घेत नाहीत, असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल जाहीर व्यक्त केला. यावरून महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेत्यांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.


नाना पटोले म्हणाले की, "ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. विधान परिषदेच्या दोन जागा तुम्ही लढा आणि दोन जागा आम्ही लढतो असे मी त्यांनी सांगितले. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण? असे विचारले. त्यावर मी उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधल्या काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलावून घेतले आणि स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता, तर या चारही जागा जिंकणे सोपे झाले असते. ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला. पण त्यांचे ऑपरेटर 'साहेब तयार होत आहेत', असा निरोप देत होते. शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल," असेही पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

वीस वर्षांनी आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का वाद घालता ? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : आम्ही दोघं भाऊ जर वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांशी का वाद घालता ? आता वाद न घालता

बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे : हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम