ग्रामपंचायतींना प्रशासकीय माहिती फलकावर लावणे बंधनकारक

  45

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश


अलिबाग : ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, तसेच त्यांचे वेतन, नेमणुकीचा दिनांक आदी माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी माहिती आता दर्शनी भागावर झळकणार आहे.


अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुविल यांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम काय आहे, त्याचे वेतन किती आहे, नेमणूक कधी झाली, याबाबत माहिती अधिकार अधिनियम २००५, कलम ४-अ नुसार माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.


दरम्यान नियमांचे पालन होताना दिसत नाही. याबाबत अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुचिल यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लिहून मागणी केली होती. सुनीलकुमार यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटीशनबाबत निकालही अर्जासोबत जोडला होता. या निकालानुसार अंमलबजावणी सर्व कार्यालयांना करणे बंधनकारक अनिवार्य केले आहे, याची आठवण करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. सुनीलकुमार यांनी जिल्हा परिषदेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केल्यानंतर हा निर्णय झाल्याने माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी सुनीलकुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात माहितीचे फलक झळकणार आहेत.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून