ग्रामपंचायतींना प्रशासकीय माहिती फलकावर लावणे बंधनकारक

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश


अलिबाग : ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, तसेच त्यांचे वेतन, नेमणुकीचा दिनांक आदी माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी माहिती आता दर्शनी भागावर झळकणार आहे.


अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुविल यांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम काय आहे, त्याचे वेतन किती आहे, नेमणूक कधी झाली, याबाबत माहिती अधिकार अधिनियम २००५, कलम ४-अ नुसार माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.


दरम्यान नियमांचे पालन होताना दिसत नाही. याबाबत अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुचिल यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लिहून मागणी केली होती. सुनीलकुमार यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटीशनबाबत निकालही अर्जासोबत जोडला होता. या निकालानुसार अंमलबजावणी सर्व कार्यालयांना करणे बंधनकारक अनिवार्य केले आहे, याची आठवण करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. सुनीलकुमार यांनी जिल्हा परिषदेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केल्यानंतर हा निर्णय झाल्याने माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी सुनीलकुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात माहितीचे फलक झळकणार आहेत.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य