Vinod Tawde : जे पी नड्डांनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लागणार विनोद तावडेंची वर्णी?

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानामुळे चर्चांना उधाण


कोल्हापूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची भाजपाने एनडीए सरकारमध्ये (NDA Government) केंद्रीय आरोग्यमंत्री पदावर नियुक्ती केली आहे. त्यामळे आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी (BJP National President) नवा नेता निवडला जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेलं वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.


कोल्हापूरमध्ये आज माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विनोद तावडे हे कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जिथे पाठवू त्याठिकाणी यश कसे मिळेल, यादृष्टीने सगळे बारकावे ते पाहतात. १९९५ ला तावडे महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर ते भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेले, आता ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. आज भाजप पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना काय द्यायचं आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. भाजपमध्ये खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तर ते मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


पुढे पाटील यांनी सूचकपणे म्हटलं की, विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे