Yavatmal crime : शेतकरी कुटुंबाची तब्बल ३० लाखांची रोकड आणि २० तोळे सोनं लुटलं!

यवतमाळमध्ये सर्वात मोठा सशस्त्र दरोडा


यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरोडेखोरांनी एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३० लाखांची रोकड आणि २० तोळे सोनं लुटल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या महागांव तालुक्यातील (Mahagaon Taluka) चिल्ली ईजारा (Chilli Ijara) येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा (Armed robbery) टाकण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबातील संतोष पांडे हे शेतकरी असून महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जंगलात त्यांचा एक मोठा वाडा आहे. तसेच त्यांची वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पांडे कुटुंबाने कापूस विकला होता. कापूस विकून मिळालेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज पांडे कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवण्यात आला होता.


रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्यानं वाड्यात घुसले. संतोष कुमार पांडे यांच्या सोबत त्यांची बहीण कु. कृष्णा मनोहर पांडे (३५) आणि सौ. सविता सुभाष तिवारी (४९) रा. नागपूर, ह्या काल रात्री घरात मुक्कामी होत्या. दरोडेखोरांनी सर्वात आधी संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली. बंदूक आणि त्यानंतर तलवारीच्या धाकावर दरोडेखोरांनी घराची झाडाझडती घेत ३० लाखांवर रोख रक्कम आणि १७० ग्राम सोन्यांचे दागिने असा ३८ लाख ५० हजाराचा ऐवज लुटून नेला. यात संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे, सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबियांच्या घरावर ज्या दरोडेखोरांनी दरोडा घातला, ते सर्व दरोडेखोर हिंदी आणि मराठीत बोलत होते, अशी माहिती पीडित कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकाराची तक्रार पांडे कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात दिली.



पोलिसांचा तपास सुरु


घटनेचं गांभीर्य ओळखून महागावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव याप्रकरणी कसून तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह डॉग युनिट, फिंगर प्रिंट यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)