Jalna news : घरकुल योजनेत घर न मिळाल्याने जालन्यात तीन तरुणांचे धक्कादायक कृत्य!

  131

हातात डिझेलच्या बॉटल्स घेऊन जिल्हा परिषदेसमोरच केलं असं काही...


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जालना (Jalna news) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातच आज जालन्यात घडलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमाई आवास घरकुल योजनेत (Ramai Awas gharkul yojana) घर न मिळाल्यामुळे तीन तरुणांनी जालना जिल्हा परिषदेसमोरच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना अडवल्यामुळे अनुचित प्रकार होता होता टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील या तरुणांनी हातात डिझेलच्या बॉटल्स आणि ज्वलनशील पदार्थ आणले होते. ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणांच्या हातातील बॉटल्स हिसकावून घेत त्यांना अडवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गावातील ३२ जणांना रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळाले आहे. मात्र, या तीन तरुणांना ते मिळालेले नाही. त्यांनी आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला.



युवक काय म्हणाले?


झाल्या प्रकाराबाबत संतप्त होत तरुणांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं जातं. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या युवकांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची