Jalna news : घरकुल योजनेत घर न मिळाल्याने जालन्यात तीन तरुणांचे धक्कादायक कृत्य!

हातात डिझेलच्या बॉटल्स घेऊन जिल्हा परिषदेसमोरच केलं असं काही...


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जालना (Jalna news) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातच आज जालन्यात घडलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमाई आवास घरकुल योजनेत (Ramai Awas gharkul yojana) घर न मिळाल्यामुळे तीन तरुणांनी जालना जिल्हा परिषदेसमोरच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना अडवल्यामुळे अनुचित प्रकार होता होता टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील या तरुणांनी हातात डिझेलच्या बॉटल्स आणि ज्वलनशील पदार्थ आणले होते. ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणांच्या हातातील बॉटल्स हिसकावून घेत त्यांना अडवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गावातील ३२ जणांना रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळाले आहे. मात्र, या तीन तरुणांना ते मिळालेले नाही. त्यांनी आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला.



युवक काय म्हणाले?


झाल्या प्रकाराबाबत संतप्त होत तरुणांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं जातं. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या युवकांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा..

गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी.. वाढीव

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ

सचिव तुकाराम मुंढे मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21

नाशिकमध्ये तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने अधिवेशन पार पडले; अॅड. संदीप जाधव यांच्या “बोधगया : सत्य आणि विपर्यास” पुस्तकाचे अनावरण

नाशिक : नाशिक येथे तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात अॅड. संदीप जाधव लिखित “बोधगया :

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे