Sonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

बॉयफ्रेंड जहीरसोबत 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हिरामंडी' (Heeramandi) या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील तिची दुहेरी भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. यानंतर सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्याला काही निवडक व जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं असून यात 'हिरामंडी'च्या टीमची विशेष उपस्थिती असणार आहे.


सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटोज, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोनाक्षी जहीरसोबत येत्या २३ जूनला लग्नबंधनात अडकू शकते. मात्र, अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



कशी आणि कुठे झाली जहीर आणि सोनाक्षीची भेट?


जहीर आणि सोनाक्षीच्या भेटीसोबत सलमान खानचं (Salman Khan) एक खास नातं आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात ती सलमान खानसोबत झळकली होती. तर जहीर इक्बाल हा सलमानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा असून त्याला सलमाननेच आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' या फिल्ममधून लाँच केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. आता चाहत्यांना जहीर आणि सोनाक्षी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत