Sonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

बॉयफ्रेंड जहीरसोबत 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हिरामंडी' (Heeramandi) या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील तिची दुहेरी भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. यानंतर सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्याला काही निवडक व जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं असून यात 'हिरामंडी'च्या टीमची विशेष उपस्थिती असणार आहे.


सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटोज, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोनाक्षी जहीरसोबत येत्या २३ जूनला लग्नबंधनात अडकू शकते. मात्र, अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



कशी आणि कुठे झाली जहीर आणि सोनाक्षीची भेट?


जहीर आणि सोनाक्षीच्या भेटीसोबत सलमान खानचं (Salman Khan) एक खास नातं आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात ती सलमान खानसोबत झळकली होती. तर जहीर इक्बाल हा सलमानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा असून त्याला सलमाननेच आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' या फिल्ममधून लाँच केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. आता चाहत्यांना जहीर आणि सोनाक्षी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.