Accident : भीषण अपघात! पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही 'हिट अ‍ॅण्ड रन'

अपघातानंतर तरुण फरार; पोलिसांकडून शोध सुरु


छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील (Pune) हिट अ‍ॅण्ड रन (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथेही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी भरधाव वेगाने कार चालवत भीषण अपघात (Accident) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मद्यधुंद तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात घडला. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडून चारचाकी भरधाव वेगात शिवाजीनगरच्या दिशेने आली. यामध्ये तीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या तरुणांच्या चारचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार दुचाकी, हॉटेल समोर ठेवलेले सहा टेबल, घराचा ओटा, विद्युत खांबाला जोराची धडक देत नुकसान केले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची गर्दी पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून याबाबत कडक तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे