Accident : भीषण अपघात! पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही 'हिट अ‍ॅण्ड रन'

अपघातानंतर तरुण फरार; पोलिसांकडून शोध सुरु


छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील (Pune) हिट अ‍ॅण्ड रन (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथेही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी भरधाव वेगाने कार चालवत भीषण अपघात (Accident) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मद्यधुंद तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात घडला. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडून चारचाकी भरधाव वेगात शिवाजीनगरच्या दिशेने आली. यामध्ये तीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या तरुणांच्या चारचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार दुचाकी, हॉटेल समोर ठेवलेले सहा टेबल, घराचा ओटा, विद्युत खांबाला जोराची धडक देत नुकसान केले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची गर्दी पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून याबाबत कडक तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात