अलिबाग : विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी संपून आता शाळेला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत शाळा सुरु होणार असल्यामुळे सध्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात रेलचेल दिसून येत आहे. नवीन पुस्तके, वह्या, वॉटर बॅग आणि खाऊचा डबा मिळणार म्हणून चिमुरड्यांमध्येही उत्साह आहे. मात्र वाढत्या महागाईत शालेय वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
दुकानदार दर्शन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा शालेय वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर हवा तितका परिणाम दिसत नाही. मुलांचे आवडते रंग आणि कार्टूनच्या वस्तूंना अधिक मागणी आहे. तर येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शन शहा यांनी वर्तवली आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकही बाजारात पावसाळापूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट आदी साहित्य खरेदी करताना पाहावयास मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे. त्यासोबत मुलांना लागणाऱ्या शालेय बॅगच्या किमतीत अधिक वाढ दिसत आहे. उत्तम बॅग ३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र, मुलांच्या आवडीसाठी किमतीत झालेल्या वाढीकडे दुर्लक्ष करीत खरेदी करावी लागतेच असेही पालकांकडून सांगितले जाते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…