Modi Cabinet: नितीन गडकरी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल...मोदी कॅबिनेटच्या संभाव्य मंत्र्यांकडे येऊ लागले फोन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांकडे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान आणि अनुप्रियया पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.


चिराग पासवान यांचा पक्ष LJPRने बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागांवर ते यशस्वी ठरले होते. चिराग स्वत: हाजीपूर येथून निवडणूक जिंकले होते. तर नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. गडकरी सलग दोन वेळा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत .


तर अनुप्रिया पटेल यांचा अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यात अनुप्रिया पटेल यांना आपल्या जागेवर विजय मिळाला होता. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या खात्यात एनडीएकडून एकच जागा गेली होती. या जागेवर त्यांनी खुद्द निवडणूक लढवली होती आणि तेथून ते जिंकलेही. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोनही जागांवर ते निवडणूक जिंकले.



शपथ घेणाऱ्या खासदारांना भेटणार मोदी


नरेंद्र मोदी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत सकाळी ११.३० वाजता चहाची भेट घेणार आहेत. ाया बैठकीत खासदारांना त्यांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाची माहिती दिली जाईल. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Comments
Add Comment

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा