नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांकडे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान आणि अनुप्रियया पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.
चिराग पासवान यांचा पक्ष LJPRने बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागांवर ते यशस्वी ठरले होते. चिराग स्वत: हाजीपूर येथून निवडणूक जिंकले होते. तर नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. गडकरी सलग दोन वेळा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत .
तर अनुप्रिया पटेल यांचा अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यात अनुप्रिया पटेल यांना आपल्या जागेवर विजय मिळाला होता. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या खात्यात एनडीएकडून एकच जागा गेली होती. या जागेवर त्यांनी खुद्द निवडणूक लढवली होती आणि तेथून ते जिंकलेही. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोनही जागांवर ते निवडणूक जिंकले.
नरेंद्र मोदी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत सकाळी ११.३० वाजता चहाची भेट घेणार आहेत. ाया बैठकीत खासदारांना त्यांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाची माहिती दिली जाईल. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…