Modi Cabinet: नितीन गडकरी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल...मोदी कॅबिनेटच्या संभाव्य मंत्र्यांकडे येऊ लागले फोन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांकडे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान आणि अनुप्रियया पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.


चिराग पासवान यांचा पक्ष LJPRने बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागांवर ते यशस्वी ठरले होते. चिराग स्वत: हाजीपूर येथून निवडणूक जिंकले होते. तर नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. गडकरी सलग दोन वेळा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत .


तर अनुप्रिया पटेल यांचा अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यात अनुप्रिया पटेल यांना आपल्या जागेवर विजय मिळाला होता. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या खात्यात एनडीएकडून एकच जागा गेली होती. या जागेवर त्यांनी खुद्द निवडणूक लढवली होती आणि तेथून ते जिंकलेही. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोनही जागांवर ते निवडणूक जिंकले.



शपथ घेणाऱ्या खासदारांना भेटणार मोदी


नरेंद्र मोदी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत सकाळी ११.३० वाजता चहाची भेट घेणार आहेत. ाया बैठकीत खासदारांना त्यांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाची माहिती दिली जाईल. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या